विरोध बुलेट ट्रेन चा
हो मी बुलेट ट्रेन चा विरोध करतो त्याचे कारण बघायला गेलो तर खूप आहेत,बुलेट ट्रेन ला खूप छान पर्याय आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांना लोहमार्गाने जोडणे आणि जिल्ह्याच्या मध्यभागी शेतमाल साठवणुकीची सोय करणे.प्रत्येक लोहमार्गावर मालगाडी फिरली पाहिजे,जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य ती दळणवळणाची सोय उपलब्ध होईल.
समजा हा लोहमार्गचा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर आणि सरकारने प्रत्येक जिल्याच्या मध्य भागी रेल्वे स्थानकावर सरकारी खरेदी विक्री केंद्र उभारले तर शेतकरी जिल्ह्यातील जेवढा संपेल तेवढा माल विकून राहिलेला माल दुसऱ्या जिल्ह्यात ,राज्यात आणि दुसऱ्या देशात पाठवायला सरकारी खरेदी-विक्री केंद्रावर स्वतः आणून घालेल न त्याला योग्य भाव मिळेल जो मध्यस्थींकडून आणि मोठ्या व्यापाऱ्यांकडून मिळतो त्यापेक्षा जास्त. समजा रत्नागिरी जिल्ह्यात आंबा पिकतो,मग तो मध्यस्थी आणि मोठे व्यापारी असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मिळणाऱ्या किंमतीत भरमसाठ वाढ होते,मूळ शेतकऱ्याला मात्र कवडीमोल भावाने त्याचे पैसे मिळतात.जर सरकारने लोहमार्गच जाळ निर्माण केलं तर शेतकरी प्रत्तेक जिल्ह्यात सरकारी खरेदी केंद्र स्थानिक जिल्ह्यात विकून राहिलेला माल सरकारी खरेदी विक्री केंद्रावर घालू शकेल.पण हा शेतकरी जे काय विक्री करण्यासाठी पिकवेल ते सरकार ला विकत घेणे बंधन कारक असेल.
बुलेट ट्रेन मध्ये जेवढं केंद्र सरकार आणि राज्य सरकार पैसे घालेल त्याहून किती तरी पटीने कमी खर्च या लोहमार्गाला येईल.या सगळ्यात झाला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ शक्ती यात काहीच दुमत नाही.
या मध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते , शेतकऱ्यानांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते ,दळण वळण सुविधा उपलब्ध झाल्यामुळे उद्योगधंदे उभे राहू शकतात.
✍🏻 माझ्या कवच कूंडल्यातून
धन्यवाद
https://matchmindperfect.blogspot.com
No comments:
Post a Comment